महाराष्ट्र राज्याचे गौरवशाली इतिहास व मराठी माणसाचे देशाप्रती असणारे प्रेम, समर्पण ह्याची प्रचिती संपूर्ण जगाला आहे. महाराष्ट्र राज्यातील CAPF जवान आपले प्राणपणाला लावून देशाच्या कानाकोपऱ्यात देशाची अखंडता आणि आंतरिक व बाह्य आक्रमणापासून संरक्षण झाले पाहिजे म्हणून तटस्थ उभा आहे. त्यांचे हे समर्पण आणि आपला देश हा सदैव अखंड राहावा या उद्देशपूर्तीसाठी करत असणाऱ्या कार्याला बळ आणि चेतना देण्यासाठी हि संस्था कार्य करत आहे.